एस टी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार ; सोनुर्ले मार्गावरील प्रवाशांचे हाल

कोल्हापूर ते सोनुर्ले या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असून हि या रेल्वे स्टेशन बस स्थानकातून गाड्या वेळेत सोडल्या जात नाहीत. कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथील बस स्थानक बंद करण्याचा घाट अधिकाऱ्यांकडून घातला जात आहे. या साठी प्रवाशी संख्या कमी दिसावी म्हणून एस टि बसच्या फेऱ्या मुद्दामून कमी केल्या आहेत. या रेल्वे स्टेशन बस स्थानकातून कोकण परिसर तसेच दिगवडे, कनेरी, बोरगाव, कोलोली, नामधारी, पाटील वाडी, घुंगुर या परिसरातील बस फेऱ्या कमी केल्या आहेत. त्याचा त्रास परिसरातील प्रवासी अपंग व्यक्ती व्यावसायिक यांना होत आहे. याबात अनेक वेळी निवेदन देऊन ही दखल घेतली गेली नाही. एस टी अधिकाऱ्यांचा हा मनमानी कारभार थांबला नाही तर आंदोलन करण्याचा निर्णय प्रवाशांनी घेतला आहे.