भास्कर जाधव यांच्या नाराजीबाबत विक्रांत जाधव यांचा मोठा खुलासा

मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे.  या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांच्या नाराजीबाबत त्यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी मोठा खुलासा केला आहे.

मी प्रसार माध्यमांना विनंती करतो की, कुठल्यातरी पत्राचा आधार घेऊन निराधार बातम्या देऊ नका. चुकीच्या बातम्या येतात तेव्हा आम्हालाही त्रास होतो, कुटुंबाला त्रास होतो. आम्ही कुठेही जाणार नाहीत. भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात ज्या बातम्या सुरू आहेत, त्या सर्व निराधार आहेत. केवळ पत्राचा आधार घेऊ चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. भास्कर जाधव उध्दव साहेबांची साथ सोडणार नाहीत,’ असं विक्रात जाधव यांनी म्हटलं आहे. दरम्यान विक्रांत जाधव यांचं भाषण सुरू असताना भास्कर जाधव चांगलेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान त्यांनी दोन दिवसांपूर्वी या मेळाव्यासंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं होतं. त्यानंतर भास्कर जाधव हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.