चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवारांचं टीकास्र !

मुंबई (वृत्तसंस्था) : आदरणीय चंद्रकांतदादा, तुमच्या नेत्यांचा आदर सर्वांनाच आहे. पण आपल्या नेत्यांचे गुणगाण गाताना कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यामुळे सध्या खालावणाऱ्या राजकीय पातळीला काही स्तर आहे की नाही, असा प्रश्न मला पडतो, असं टीकास्र आ.रोहित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर ट्विटरद्वारे केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे पुणे भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातली निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांविषयी भाष्य केलं.

“हातकणंगल्यात रोज उठून राजू शेट्टी मोदींना शिव्या द्यायचे. माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं. ते केंद्रीय नेते ४० वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा (चंद्रकांत पाटील) मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.