कोल्हापूर जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर करावी – खा.धनंजय महाडिक 

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हयामध्ये गेल्या आठवडयाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता आहे.  पाऊस आणि थंड हवामान यांचा विपरीत परिणाम होऊन शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मुले पूराच्या पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करत शाळेला येतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हयातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलै दरम्यान सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार  धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्र दिले. कोल्हापूर जिल्हयात अतिवृष्टीमुळे  पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्हयातील ६० बंधारे पाण्याखाली गेले असून, अनेक मार्ग बंद झाले आहेत. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पाऊस आणि थंड हवा याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पूराच्या पाण्यातून वाट काढत, विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. पूरस्थितीमुळे शालेय  विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोचू नये, यासाठी खबरदारी म्हणून आजपासून तीन दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत  जिल्हयातील सर्व शाळांना सुट्टी दयावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांच्याकडे केली आहे.

न्यू वाडदेच्या सरपंच सुनीता धडके अपात्र

कोल्हापूर : न्यू वाडदे (ता. करवीर) येथील सरपंच सुनीता धडके यांना आर्थिक लाभ घेतल्या प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सरपंच व सदस्य म्हणून यापुढे अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी दाखल करण्यात…

सरपंच, नगराध्यक्ष निवड आता थेट जनतेतूनच !

मुंबई: सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड यापुढे थेट जनतेतून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

नागरिक व प्रशासनाच्या समन्वयातून पूर परिस्थितीस सामोरे जाऊया-समरजित घाटगे

कागल (प्रतिनिधी) : नागरिक व प्रशासनाच्या समन्वयातून पूर परिस्थितीस सामोरे जाऊया असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे  यांनी केले. तहसीलदार कार्यालयात पूर परिस्थितीच्या आढाव्यासाठी तहसीलदार शिल्पा…

नवी मुंबईत ‘राबाडा’चे झाले ‘रबाळे’

नवी मुंबई : वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढत्या शहरीकरणामुळे अनेक खेडी महानगरात बुडाली. अशा खेड्यांची मूळ नावेही डुबली. असाच प्रकार नवी मुंबईतील ‘रबाळे’ गावाचा घडला…आणि त्याचे ‘राबाडा’ झाला. मुंबईचा विस्तार होत असतानाच…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर छापा

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्यावर घरावरही छापा टाकला. फोन टॅपिंगप्रकरणी…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला आहे. शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात…

बालिंगेतील पूरग्रस्तांची पुनर्वसनाची मागणी

बालिंगा : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी वसाहतीमधील पूरग्रस्त ग्रामस्थांनी पुनर्वसन करण्याची मागणी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. याबाबतची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पूरग्रस्त बालिंगा…

राजकीय गोंधळामुळं अधिकाऱ्यांवर ‘डोकं’ धरण्याची वेळ !

मुंबई : राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे बदल्यांसाठी वेटींगवर असणारे अधिकारी हायटेंशनवर आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री देखील अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री कार्यालय येथे अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या फाईल्स पडून असून त्याबाबत अद्याप कार्यालयाने कोणताही…

🤙 8080365706