चांदोली अभयारण्य प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या सर्व खातेदारांना जमेनी देऊन लवकरात लवकर पुनर्वसन करावे : आ. विनय कोरे

कोल्हापूर : कोल्हापूर (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकात पुलकुंडवार व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त व शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे – चरण रस्त्यावर नव्याने होणाऱ्या हायवे रस्त्याला पास करण्यासाठी उड्डाणपूल होण्यासदर्भात आढावा बैठक पार पडली.

चांदोली अभयारण्य प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या सर्व खातेदांराना १०० टक्के जमिनी देऊन त्यांचे पुनर्वसन करणेबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. पण आज अखेर कोणतीही कार्यवाही करणेत आली नसलेचे निदर्शनास आणून दिली.तरी चांदोली अभयारण्य प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या सर्व खातेदारांना १०० टक्के जमिनी देऊन त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे अशा सूचना आ. विनय कोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच या झालेल्या बैठकीत चांदोली अभयारण्य ग्रस्तांना १०० % पुनर्वसनाचा आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याकरिता विचार विनिमय करण्यात आला.तसेच पुनवर्सन करताना पर्यायी देय जमीन,भूखंड,गायरान जमीन,मूलकीपड जमीन,लाभक्षेत्रातील जमीन,पर्यायी देय जमीन अनुदान याबद्दल चर्चा करण्यात आली.
तसेच शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे – चरण रस्त्यावर नव्याने होणाऱ्या हायवे रस्त्याला पास करण्यासाठी उड्डाणपूल होण्यासदर्भात ग्रामस्थांच्यावतीने मला निवेदन देण्यात आले होते.आज विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकात पुलकुंडवार व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याबरोबर चर्चा करून लवकरात लवकर या ठिकाणी उड्डाणपूल व्हावे अशी मागणी केली.
यावेळी डॉ.भारत पाटणकर,उपवनसंरक्षक वन्यजीव श्री गुरुप्रसादजी,प्रकल्प अधिकारी,उपविभागीय अधिकारी इचलकरंजी विभाग यांच्यासह बैठकीत संघटनेच्या वतीने डी.के.बोडके,राजाराम पाटील,मारुती पाटील,नजीर चौगुले,संतोष गोटल यांच्यासह चांदोली अभयारण्यग्रस्त संघटनेचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545