राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळ्याचे अनावरण आज कसबा बावडा भगवा चौक येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते व नेते राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. हा भव्य पुतळा शौर्य, न्याय आणि स्वाभिमान या तत्वांची आपल्या सर्वांना कायमस्वरूपी प्रेरणा देत राहणार आहे.

 

यावेळी राहुल गांधी यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजच्या काळात पुढे घेऊन जाणे म्हणजे संविधानासोबत उभे राहणे आणि सर्वसमावेशक न्यायासाठी प्रयत्न करणे” अशी भूमिका मांडली. ही भूमिका समस्त महाराष्ट्राला दिशा देणारी आहे.

याप्रसंगी शाहू छत्रपती महाराज, रमेश चेन्निथला जी, नाना पटोले जी, बाळासाहेब थोरात जी, विजय वडेट्टीवार जी, सुशीलकुमार शिंदे जी, पृथ्वीराज चव्हाण जी, डॉ. संजय डी. पाटील जी, मालोजीराजे छत्रपती आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रजनी पाटील, प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, नसीम खान, विश्र्वजीत कदम, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, राहुल पी. एन. पाटील यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सभापती, उपसभापती, आदी मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुतळा समितीचे सदस्य, कसबा बावडा, लाइन बाजार वासीय, सर्व तरुण मंडळे यांनी  सक्रिय सहभाग घेतला.

🤙 8080365706