मनोज जरांगे पाटलांची ईडीमार्फत चौकशी करा ; ओबीसी आंदोलकाची मागणी

जालना: ओबीसी आंदोलन नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटलांची ईडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून जालन्यातील अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर तिथून काही अंतरावरच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ही ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण करत आहेत.

नवनाथ वाघमारे म्हणाले की, मनोज जरांगे यांना मंत्री रात्री येऊन भेटत असतील तर त्यांचं काम काय आहे? रात्रीत बंद दाराआड काय चालतं? 100 खोक्याचा अपहार झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. याबाबत राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे.

जरांगे यांची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे. आमच्या मागे कोण शासकीय हे आम्ही वारंवार सांगत असतो. जरांगे यांच्या मागे मुख्यमंत्री आणि तुतारी वाल्यांचा हात आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.