महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी: डॉ. काणे यांचे आवाहन

कोल्हापूर ( श्रीकांत पाटील) : रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी, कुटुंबाला वेळ देतानाच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्ष डॉ. वसुधा कर्णे यांनी केले.

वीरशैव लिंगायत माळी समाज महिला मंडळ कोल्हापूर व सावित्री शक्तीपीठ कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कर्णे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शक्तीपीठाच्या सरव्यवस्थापक सुवर्णा कोरे होत्या. प्रारंभी संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी माळी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष साधना माळी यांनी स्वागत केले. यावेळी हेमलता माळी व सुवर्णा कोरे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील महिलांचा ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये शितल माळी, पुष्पा माळी, शुभांगी माळी, वनिता माळी, मानसी माळी, भारती माळी, कविता माळी, सुवर्णा माळी यांचा समावेश होता.

यावेळी सौ. साधना माळी यांची वीरशैव लिंगायत माळी समाज महिला मंडळ कोल्हापूर जिल्हा च्या अध्यक्ष पदी व सौ. मीनाक्षी माळी यांची सावित्री शक्तीपीठ, कोल्हापूर च्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सूत्रसंचालन अर्चना माळी व निर्मला माळी यांनी केले. आभार वैशाली माळी यांनी मांडले. या कार्यक्रमास वंदना माळी, विद्या माळी, छाया माळी, अंकिता माळी, इंद्रायणी चौगुले, भारती माळी, रूपाली माळी यांच्या सर्व यांच्यासह सर्व संचालिका उपस्थित होत्या.

🤙 8080365706