कराड : भाजपा संघटन पर्व कार्यक्रम व वस्ती संपर्क अभियानाच्या अनुषंगाने सातारा, सांगली, कोल्हापूर या विभागांतील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक भाजपा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे संपन्न झाली. खासदर धनंजय महाडिक यांनी बैठकीला उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
“राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या विचारधारेच्या मार्गावर आपण सर्वजण वाटचाल करत आहोत. त्यामुळे संघटनेच्या दृष्टीने आपण स्वतः मोठे नाही, तर आपली संघटना ही आपल्यापेक्षा महत्त्वाची आहे. भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासाठी ‘कमळ’ हीच आपली ओळख आहे. याविषयी . रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या बैठकीदरम्यान भाजपा संघटन पर्व व वस्ती संपर्क अभियानाचे उद्दिष्ट, त्याची अंमलबजावणी, यशस्वीतेसाठी लागणारी रणनीती आणि स्थानिक पातळीवर जनतेशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. यासोबत आगामी काळात पक्षाचे बळ वाढवण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी हे अभियान किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विशेषतः युवा कार्यकर्त्यांनी या संघटनात्मक कामकाजात अधिक सक्रिय होण्याचे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
याप्रसंगी प्रदेश महामंत्री राजेश पांडे, मकरंद देशपांडे, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह तीनही विभागातील जिल्हाध्यक्ष, विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.