शिंगणापूर ग्रामपंचायत बरखास्त करावी; उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर ( संग्राम पाटील) ,

वादग्रस्त ठराव केल्याप्रकरणी शिंगणापूर ग्रामपंचायत बरखास्त करावी अशा मागणीचे निवेदन शिवाजी पेठ येथील आम्ही भारतीय संघटना यांच्यातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन गुरुवारी देण्यात आले.

शिंगणापूर गाव सभेत नवीन मुस्लिम मतदारांची नावे मतदार यादीत नोंदवू नये असा ठराव करण्यात आला. धर्मावरून एखाद्याला मतदान नोंदणी पासून वंचित ठेवणे ही बाब निषेधार्थ आहे. हे ग्रामपंचायत त्वरित बरखास्त करून ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळात चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, चंद्रकांत सूर्यवंशी, आनंदराव चौगुले, अमर जाधव, रमेश वडनगेकर, जयंत मिठारी, राजेंद्र खद्रे यांचा समावेश होता.