कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार केला जात आहे. मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहे. तेथील लष्कर आणि हंगामी सरकार हिंदूंचे रक्षण करण्यास असमर्थ दिसून येत आहे. भारतातही लँड जिहाद, लव्ह जिहाद, गोहत्या अशा समस्या सातत्याने वाढत असून युवतींचे गायबी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गोहत्येचा कायदा असूनही अनेक ठिकाणी गोरक्षकांवर हल्ले होत आहेत, गायींची कत्तल होत आहे. ‘वक्फ’द्वारे हिंदूंच्या जमिनी बळकावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे एकूणच हिंदु धर्म, हिंदू यांवर होणार्या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी १७ ऑगस्टला हिंदु धर्म परिषद शाहू स्मारक येथे आयोजित करण्यात आली.

या सभेत ‘हिंदुत्व’ याविषयावर सद्गुरु संतोष तथा बाळ महाराज, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आणि आजचे वास्तव’ यावर प्रा. राजेंद्र ठाकूर यांचे, ‘हिंदु धर्मावर होणारे विविध आघात आणि लव्ह जिहाद’ यावर सनातन संस्थेच्या संत सद्गुरु स्वाती खाडये या मुख्य वक्त्यांचे, तसेच अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केलं . या धर्मपरिषदेचे औचित्य साधून आई अंबाबाई, आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन देव, देश आणि धर्म हिताचे १५ ठराव संमत केले जाणार असून हिंदु धर्म रक्षणाची शपथ घेण्यात आली .
कोल्हापूर येथे विशाळगडच्या संदर्भात नुकताच जो उद्रेक झाला, त्याला गडावरील अतिक्रमण कारणीभूत असतांना केवळ एकतर्फी शिवप्रेमींवरच गुन्हे दाखल करण्यात आले. देशात श्रीराम नवमी, हनुमानजयंती, बंगालमध्ये दुर्गा मिरवणुकीत आक्रमणे केली जात आहेत, साधू-संत यांच्यावर खोटे आरोप केले जात असून देवतांविषयी अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. अल्पवयीन अल्पसंख्यांक समाजातील युवकांना पुढे करून हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांचा सामाजिक माध्यमांद्वारे अवमान केला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक तेढ निर्माण केल्याच प्रयत्न केला जात आहे. हजारो हिंदूंची हत्या करणारा टीपू सुलतान, औरंगजेब याचे उदात्तीकरण करण्याचा डाव चालू आहे. या सर्वांवर उपाय म्हणून हिंदूंनी संघटित होणे, त्यांना धर्मशिक्षण मिळणे अत्यावश्यक झाले आहे. असे सांगण्यात आले .
या परिषदेत खासदार धनंजय महाडिक ,राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर ,शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष . निरंजन शिंदे, भाजपचे पश्चिम सचिव महेश जाधव ,हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजाजन तोडकर, सकल हिंदू समाजाचे अभिजित पाटील आणि विकी जरग,. वाघापूरकरदादा, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक . सुनील सामंत, विश्व हिंदु परिषदेचे अनिल दिंडे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष . दीपक देसाई, शिवसेनेचे अर्जुन आंबी, मराठा तितुका मेळवावा संघटनेचे योगेश केरकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समितीचे . शिवानंद स्वामी,सत्यजित कदम , मराठा व्यावसायिक संघटनेचे प्रसन्न शिंदे यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या
