
काजू आरोग्याला इतके फायदेशीर असूनही या विशिष्ट लोकांनी त्याचे अतिसेवन नाही केले पाहिजे, कारण त्यातील असणारे घटक काही विशिष्ट आजार असणाऱ्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.
मायग्रेनग्रस्त: डोकेदुखी अथवा मायग्रेनग्रस्त लोकांनी काजूचे अधिक सेवन नाही केले पाहिजे. विशेषतज्ञांच्या अहवालानुसार काजूमधील असलेले अमिनो एॅसिड डोकेदुखी आणि मायग्रेनग्रस्त लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्यांनी नियंत्रणात काजूचे सेवन करावे.
पोट फुगणे गॅस: काजूमध्ये फायबर अधिक प्रमाणावर आढळुन येते. जे शरीरासाठी खुप फायदेशीर आहे. मात्र अधिक प्रमाणावर फायबर पोट फुगणे आणि गॅससारखे गंभीर आजाराचे कारण बनू शकते. त्यामुळे ज्यांना पचानाच्या संबंधित त्रास असतील तर त्यांनी कमी प्रमाणात काजूचे सेवन करावे.
लठ्ठपणा: जर आपल्याला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर, काजूचा आहारात समावेश कमी प्रमाणात करावा. विशेषतज्ञांच्या अहवालानुसार काजूमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अतिसेवनाने शरीरात कॅरीजची संख्या वाढू शकते. काजू आपल्याला खायला आवडत असेल तर त्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
उच्च रक्तदाब: काजूमध्ये जास्त प्रमाणात सोडियमचे प्रमाण आढळुन येते. जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. जर आपण रक्तदाबासारख्या समस्याशी दोन हात करत असाल, तर काजूचे सेवन कमी करावे. कारण काजूचे सेवन आहारातून अधिक कराल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला पडू शकतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. इतकेच नाही तर सोडियमचा थेट परिणाम आपल्या किडनीवरही होतो.
