मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली !

मुंबई: मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघात वेळ देता येणार नाही म्हणून त्यांनी ही जबाबदारी सोडल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून तिढा सुरू आहे. हा तिढा अजून सुटला नसताना वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांनी सोडली आहे.

 

यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. याबाबत हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. यामुळे वाशिम जिल्ह्याची जबाबदारी आता दत्ता भरणे यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा कालच राजीनामा दिला. तर दुसऱ्याच दिवशी हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.