![](https://newsmarathi24.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230811-WA0019-1024x683.jpg)
कोल्हापूर : कसबा बावडा येथील भगवा चौकात श्रीराम सोसायटी व ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
![](https://newsmarathi24.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230809-WA0048-1024x1024-1.jpg)
निवेदनात म्हटले आहे की, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमीमुळे कसबा बावडास ऐतिहासिक, छ. राजाराम सहकारी साखर कारखाना मुळे औद्योगिक व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक संकुलामुळे कसबा बावडा गावाचे नाव राज्य, देश व जागतिक पातळीवर नोंदवले गेले आहे.
शेतकर्यासाठी कार्यरत असणाऱ्या श्रीराम विविध कार्यकारी सेवा संस्था व ग्रामस्थांच्यवतीने लोकवर्गणीतून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करणेचा येथील सर्व समस्त शिवशाहू प्रेमी व ग्रामस्थांची मागणी आहे. या मागणीची दखल घेवून कोल्हापूर शहराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार भगवा चौक या ठिकाणी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने पुतळा उभारण्यात येणार आहे. या सदर्भात आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय नियम, अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करण्यास आम्ही तयार असून हा पुतळा उभारणीसाठी परवानगी मिळावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी श्रीराम सोसायटीचे चेअरमन हिंदुराव ठोंबरे व सर्व संचालक, शिवशाहूप्रेमी उपस्थित होते.