वैरण आणण्यासाठी शेताकडे जात आसताना कसबा ठाणे येथील उपसरपंचाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू

पन्हाळा : वैरण आणण्यासाठी शेताकडे जात असताना गव्याने हल्ला केल्याने पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाण्याचे माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील (वय 48 )यांचा जागीच मूत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आज दूपारी दोन वाजण्याच्या सूमारास म्हारकी येथील शेतात माणिक पाटील जनावरांना वैरण आणण्यासाठी जात असताना गवा मक्क्याच्या शेतात उभा असताना गव्याने त्यांच्यावर हल्ला केला.

यावेळी त्यांच्या छातीत शिंग घूसल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी ,दोन मूली असा परिवार आहे.