
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक मोठी दुर्घटना झाल्याची बातमी समोर येत आहे. येथील गंगा नदीतील अहिल्याबाई घाटावर 34 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट शनिवारी सकाळी नदीत उलटली.
मात्र आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे सर्व लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आलं असून जखमींना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. यातील 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी अहिल्याबाई घाटासमोर 34 भाविकांनी भरलेली बोट अचानक बुडाली. बोट बुडाल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरु होताच जवळ उपस्थित असलेल्या इतर बोटींसह एनडीआरएफ, पोलीसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि अथक प्रयत्नांनंतर बोटीतील प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना जवळील कबीर चौरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.