कोल्हापुरात शेतकऱ्यांकडून गुळ सौदे बंद

कोल्हापूर(प्रतिनिधी): कोल्हापूर मार्केट यार्डमधील गुळाचे सौदे आज (मंगळवारी) शेतकऱ्यांनी बंद पाडले. गुळाला ३७०० रुपये दर मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.


गुळ व्यापाऱ्यांनी दर पाडल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.जोपर्यंत गुळाला दर मिळत नाही तोपर्यंत गुळ सौदे बंद ठेवणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आज मार्केट यार्डच्या सौद्या वेळी गोंधळ घातला.यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.यामुळे मार्केट यार्ड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.