पन्हाळगडाच्या तटबंदी, बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

पन्हाळा : साडेतीनशे वर्षांपासून इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या पन्हाळगडावरील तटबंदी आणि बुरुजांनी वाढलेल्या झाडीझुडपांपासून मोकळा श्वास घेतला. शिवभक्तांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे तटबंदी, बुरुज स्वच्छ झाले.

  गेल्या तीस वर्षापासून इतिहासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रच्या वतीने घेण्यात आलेल्या पन्हाळगड दुर्गसंवर्धन मोहिमेत अनेक शिवभक्त सहभागी झाले होते. शिवराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मोहिमेचे महत्त्व विशद केले. मोहीम प्रमुख राजेंद्र पोवार यांनी संवर्धन मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. मोहीम प्रमुख श्रेयस भंडारी, अभिजित पवार, गणेश कदम, विनायक जरांडे, अमित पोरलेकर, सुनील जाधव, अमर पाटील, प्रतिक लिगडे यांनी या मोहिमेसाठी नियोजनाबाबत विशेष परिश्रम घेतले.