मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं : सुनील तटकरे

मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.  2021  मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी मोदींची विकासकामांबाबत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक होते असा खुलासा तटकरेंनी केला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना 2021 साली  दिल्लीतल्या भेटीनंतर मुंबईत ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्या बैठकीत संजय राऊतांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे, असा गौप्यस्फोट सुनील तटकरेंनी केला आहे.

2021 साली  तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी जेव्हा दिल्लीमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते.  तिथून परत आल्यावर संजय राऊतांचे मला पाच ते सहा वेळा फोन आले आणि त्यांनी अजितदादांना भेटीसाठी वेळ मागितली होती.  त्यानुसार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पहिल्यांदा आम्ही भेटलो पण तेव्हा अजितदादा सोबत नव्हते.  दुसऱ्यांदा मी अजितदादांना घेऊन परत तिथे मीटिंग करता गेले तेव्हा तिथे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित होते.त्यावेळी संजय राऊतांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे.  त्यांना वाटतं आहे की हे सरकार मोडावं आणि भाजपसोबत जावे.  असे सुनील तटकरे म्हणाले,

🤙 9921334545