शहरातील दलित वस्त्यांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास प्राधान्य : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शहरातील विविध दलित वस्त्यांमध्ये मुलभूत सोयी सुविधांचा वाणवा असून, आगामी काळात शहरातील दलित वस्त्यांना मुलभूत सोयी सुविधा पुरवण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्र.क्र.२८ अंतर्गत सिद्धार्थनगर येथे जयंती नदीला सन २०१९ व २०२१ साली आलेल्या महापुराचे पाणी सिद्धार्थनगर मधील नागरी वस्तीत येवून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रापंचिक साहित्याचे, इमारतींचे आर्थिक नुकसान झाले होते. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्यात सदर भागातील नागरिकांची घरे बाधित होतात. त्यामुळे या पूरग्रस्त भागात पूर संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. याबाबतची मागणी भागातील स्थानिक नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना केली होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रत्यक्ष जागेची पाहणी करून निधी मागणी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शासनाच्या नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर पूरसरंक्षक भिंत बांधणे या कामास रु.२ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शासनाच्या नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर पूरसरंक्षक भिंत बांधणे या कामास रु.२ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा शुभारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी माजी महापौर सरिता मोरे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, निलेश हंकारे, इंद्रजीत आडगुळे, अल्पसंख्याक सेनेचे रियाज बागवान, उपशहरप्रमुख कपिल नाळे आदी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.