
मुंबई : शेफाली वर्माच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाला आज इतिहास रचण्याची संधी आहे. १९ वर्षांखालील महिलांच्या विश्वकरंडकाची अंतिम लढत आज रंगणार असून भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आहे.

पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही देश विश्वविजेता होण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.
