नांदेड : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत नांदेड जिल्ह्यातील गुरुवारी चौथ्या दिवशी दोघांना आयचर (ट्रक) वाहनाने उडविले. या घटनेत एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान, अपघातानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत जखमी असलेल्या यात्रीची विचारपूस केली दरम्यान, रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास महादेव पिंपळगाव परिसरात नांदेड-अकोला हायवेवर पायी चालणाऱ्या तामिळनाडू राज्यातील गणेशन (६२) आणि सययुल (३०) या दोन यात्रेकरुना आयचरने धडक दिली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु गणेशन (६२) यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जखमी यात्रीवर उपचार सुरू आहेत.
