आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकरांनी वैदयकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्याच्या दिल्या सूचना

मुंबई : साथरोग कायद्यात सुधारणा करणे, त्याची कठोर अंमलबजावणी यासह आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणेसंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

साथीचे रोग नियंत्रणात राहावे यासाठी साथरोग कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच साथरोग कायद्यात सुधारणा करण्याच्या सूचना देत रिक्त पदांचा व प्रतीक्षा यादिवरील जागा तात्काळ भरण्याच्या सूचना मंत्री आबीटकरांनी केल्या.

वैदयकीय अधिकाऱ्यांच्या २० मधील प्रतिक्षा यादीतील ४०० जागा १५ दिवसांच्या आत भरल्या जाणार आहेत. तसेच वैदयकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा तात्काळ आढावा घेऊन (साधारण २००० पदे) पदभरती प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही दिल्या.

जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी, तज्ञ वैद्यकिय अधिकारी s २३ पदे एमपीएससी कक्षेबाहेर काढून सर्व पदे विभागीय पदोन्नतीद्वारे भरण्याची तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.

माणसाच्या जीवनात सर्वात महत्वाचा असणारा आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये व त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत त्यांनी उपाययोजना करण्यास सांगितले.

नगरविकास व ग्रामविकास विभागाने पाणी, अन्न , स्वच्छ्ता या बाबीवर विशेष लक्ष द्यावे. आरोग्य विभागाने यासाठी या दोन्ही विभागावर लक्ष केंद्रित करावे असे निर्देश दिले.

साथीचे आजार नियंत्रण करण्यासाठी कठोर पावले उचलावी. आजार होऊ नये यासाठी पूर्व खबरदारी घेण्यासाठी काय उपाय योजना करता येतील यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने काम करावे.

गेल्या काही वर्षात आपण असे चित्र पाहिले आहे की अन्न, पाणी व स्वच्छता या बाबीवर गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने अनेक आजारांनी जनता त्रस्त झाली. कोविड च्या काळातही आपण अन्न, पाणी प स्वच्छता यासारख्या बाबीवर गांभीर्याने लक्ष दिले नाही त्यामुळे ही साथ पसरत गेली.

अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने अनेक आजार होतात. GBS सारखा आजार हा अशुद्ध पाण्यामुळे होत आहे. डेंग्यू, झिका,मलेरिया इतर आजार दूषित पाण्यामुळे होत आहेत त्यामुळे या सर्व बाबीवर गांभीर्याने लक्ष द्यावे.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.