कोल्हापूर –कोल्हापूरात १०० एकर जागेत आयटी पार्क निर्माण करण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कोल्हापूरमध्ये आयटी पार्क निर्माण करण्याची मागणी केली आहे.

जागतिक आर्थिक परिषदेतील गुंतवणूक करारांद्वारे १०० एकर जागेत आयटी पार्क उभारला जात असल्यास, स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळून कोल्हापूरच्या आर्थिक वाढीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
