वीज पडल्याने 5 जण गंभीर जखमी ;

जळगाव : रावेरी तालुक्यात दोधे या गावात वीज पडल्याने 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी घडली आहे.जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

रावेरी तालुक्यातील  दोधे गावात मंगळवार ( दिनांक 3 ) रोजी सकाळी वीस कोसळल्याने मीराबाई प्रताप जमेरे ( वय 30 ) वय पूजा प्रताप जमेरे ( वय १३) रेखाबाई खरते ( वय 30 ) कालु खरते ( वय 30 ) आणि ज्योती चंद्रसिंग रावत (वय 32 )असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मूळ मध्य प्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी असून,उदरनिर्वाहासाठी रावेर तालुक्यात होते ते शेतीच्या कामासाठी आले होते.

जखमींना मध्य प्रदेशातील बऱहापूर येथे रुग्णालयात दाखल केलं असून जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची आवाहन करण्यात आले आहे.