कोल्हापूर:हातकणंगले आणि पेठ वडगाव येथे सुरू असलेल्या शिवराज्य भवनाच्या उरलेल्या कामांच्या विषयावर आज एका शिष्टमंडळाने खा . धैर्यशील माने यांच्याशी चर्चा केली. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी पुरेसा अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली.

या बैठकीत अतिरिक्त निधी देणे, पुढील टप्प्यातील कामे आणि तालुका पातळीवर समन्वय समिती स्थापन करणे या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. शिवराज्य भवनाचे बांधकाम दर्जेदार, योग्य नियोजनाने आणि ठराविक वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
