बहिण-भावाची आत्महत्या: आईच्या निधनाच्या विरहाने घेतला टोकाचा निर्णय

कोल्हापूर: बहिण भावाने कोल्हापुरातील राजाराम तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला. भूषण निळकंठ कुलकर्णी (वय 61) भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी (वय 57,दोघे रा .नाळे कॉलनी,संभाजी नगर,कोल्हापुर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम तलावात गुरुवारी सकाळी दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या भावंडाची नावे आहेत .हे दोघेही अविवाहित असून अडीच महिन्यापूर्वी आईचे निधन झाल्याने नैराश्यातून आणि विरह सहन न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तर तपासणीसाठी सीपीआर मध्ये पाठवले.

🤙 9921334545