
कोल्हापूर : कोल्हापुरात आज सम्मेद शिखरजी वाचवा, असा नारा देत हजारो जैन बांधवांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला. मात्र गर्दीचा अंदाज न आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित झाल्याने देशभरातून दिवसागणिक विरोध वाढत चालला आहे.
कोल्हापुरात आज सम्मेद शिखरजी वाचवा, असा नारा देत हजारो जैन बांधवांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाला किती लोक येतील याचा अंदाज न आल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. मोर्चासाठी झालेल्या अभूतपूर्व गर्दीने शाहुपूरीमधील वाहतूक अक्षरश: तुंबल्याचे दिसून आले. जैन समाज पहिल्यांदाच एकटवणार असल्याने कोल्हापूर पोलिसांना गर्दीचा अंदाज आला नाही. दुसरीकडे, श्रद्धेचा विषय असल्याने जैन समाजातील आबालांपासून वृद्धांपर्यंत उत्त्स्फूर्तपणे गर्दी दिसून आली. यामुळे काही हजारांमध्ये मोर्चा होईल, असा अंदाज असताना भव्य स्वरुपात मोर्चा निघाला. मोर्चासाठी निवडलेला मार्गही मोठा असल्याने वाहतूक व्यवस्थेवर विपरित परिणाम झाला.