
नागपूर : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना स्वतःच स्वतःचे कौतुक करून घेत, एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलंय असं ते म्हणाले आहेत.

म्हणूनच बदनामीचे प्रयत्न होत आहेत. जनतेला माहित आहे, आज हे गद्दार मुख्यमंत्री ज्या घोटाळा प्रकरणात अडकले आहेत, ते आम्हाला सभागृहात सादर करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्ष हे सतत वेलमध्ये येत आहे आणि अध्यक्ष, तालिका अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत. त्या बाजूला 14 जणांना बोलू दिलं, तेही एकापाठोपाठ. अडीच वर्षात मी तरी असं हाऊस सुरु असल्याचं पाहिलं नाही. मी लहानपणापासून टीव्हीवर अधिवेशन पाहिलंय. पण सत्ताधारी पक्ष वेलमध्ये येऊ आंदोलन करतोय, असं कधीच दिसलं नाही. एका 32 वर्षांच्या तरुणाने एका खोके सरकारला हलवून ठेवलंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
