मुंबईत पाच हजार कोटींचे रस्ते बनवणार तरी कसे? : आदित्य ठाकरें

मुंबई महापालिकेच्या कारभारावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. “मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे”, असा आरोप त्यांनी केला असून मुंबईत पाच हजार कोटींचे रस्ते बनवणार तरी कसे? असा सवालही त्यांनी केला आहे.

“घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटींची घोषणा केली होती. त्यासाठी काढलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे”, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुंबईत पाच हजार कोटींचे रस्ते बनवणार तरी कसे? असा सवालही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मुंबईतील इतर रस्त्यांची कामं रखडली आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईकरांच्या खिशातून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी १७०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. हे सौंदर्यीकरण नेमकं कसं करण्यात येणार आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

सौदर्यींकरण म्हणजे केवळ एलईडी लाईट लावणं नव्हे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. “मुंबई महापालिकेत दडपशाही सुरू आहे. काही लोकांच्या ९० दिवसात सहा वेळा बदल्या झाल्या आहेत. हे सरकार बदली सरकार आहे”, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

🤙 8080365706