पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल ; 55 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे चालली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 35 फूट 8 इंच आहे. राधानगरी धरणात 137.11 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली आहेत.

शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धामणी नदीवरील आंबर्डे बंधाऱ्यावर तसेच कुंभी नदीवरील गोठे पुलावर पाणी आल्याने धामणी खोऱ्यातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. टेकवाडीला (ता. गगनबावडा) पुराचा वेढा पडला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व शिरगांव, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे व गारगोटी, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, मांगले सावर्डे, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे, पणुंद्रे व आंबर्डे असे 55 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 137.11 दलघमी, तुळशी 56 दलघमी, वारणा 581.52 दलघमी, दूधगंगा 348.59 दलघमी, कासारी 53.22 दलघमी, कडवी 43.69 दलघमी, कुंभी 45.08 दलघमी, पाटगाव 60.14 दलघमी, चिकोत्रा 25.21 दलघमी, चित्री 27.95 दलघमी, जंगमहट्टी 20.67 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 24.67 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

        तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 35.2 फूट, सुर्वे 33.11 फूट, रुई 63.6 फूट, इचलकरंजी 59 फूट, तेरवाड 53.6 फूट, शिरोळ 46.4 फूट, नृसिंहवाडी 45.6 फूट, राजापूर 34.6 फूट तर नजीकच्या सांगली 18 फूट व अंकली 23.3 फूट अशी आहे.