कोल्हापूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली इचलकरंजी महानगरपालिकेला 657 कोटी रुपयांचा GST परतावा मंजूर करण्यात आला आहे. हा निधी शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर महत्वाच्या नागरी सेवांसाठी वापरण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे इचलकरंजीच्या प्रगतीला अधिक वेग येणार असून, येथील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. हे यश आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार आमदार राहुल आवाडे यांनी मानले आहेत.