जिल्हयातील सर्व गावामध्ये  स्वच्छ माझे आंगण अभियान राबविणेत येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन.एस.

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा- २ अंतर्गत जिल्हयातील सर्व गावे मार्च 2025 पर्यंत हागणदारी मुक्त अधिक मॉडेल घोषित करणेसाठी गावांमध्ये  लोकसहभागाच्या माध्यमातुन लोकचळवळ निर्माण व्हावी या उदृदेशाने दिनांक 01.01.2025 ते  दिनांक 26.01.2025 या कालावधीत स्वच्छ माझे आंगण हे अभियान राज्य शासनाकडुन दुस-या टप्यामध्ये राबविणेत येत आहे. या अभियानाची जिल्हयातील सर्व गावांमध्ये कुटुंब स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस., जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले आहे.

 

 

गावे हागणदारी मुक्त अधिक मॉडेल करणेसाठी लोकचळवळ उभी राहणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हयातील सर्व कुटुंब स्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होवून स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने दिनांक 01.09.2024 ते दिनांक 25.09.2024 या कालवधीत स्वच्छ माझे आंगण अभियान राबविणेत आले होते. या अभियानात प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेल्या कुटुंबांना वगळुन उर्वरित कुटुंबांसाठी दिनांक 01.01.2025 ते  दिनांक 26.01.2025 या कालावधीत स्वच्छ माझे आंगण अभियान राबविणे बाबत शासनाने सुचित केले आहे.

 स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा- २ अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन (कुटुंबस्तर), सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तर) राबवित असलेल्या गावातील सर्व कुटुंबस्तरावर सदर बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नित्य नियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगिकृत करण्यासाठी जे कुटुंब वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनकरिता शोषखड्डा/परसबाग/पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता करून घेतली असून त्यांचा नियमितपणे वापर करतात अशा कुटुंबाना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे अनुकरण करण्याकरिता इतर ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्या प्रमाणेच वैयक्तिक स्वरुपांच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी स्वच्छ माझे आंगण हे अभियान राबविणेत येत आहे.

सदर अभियानाची अंमलबजावणी करताना खालील बाबींवर भर देणेत आला आहे. 

 

  • वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालयाची दैनंदिन स्वच्छता, शाश्वत स्वरुपात सर्व कुटुंब सदस्यांकडून वापर आणि ही सुविधा निरंतर टिकावी म्हणून आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यात कुटुंबांचा पुढाकार.
  • कुटुंबस्तरावर दैनंदिन घनकचऱ्याचे वर्गीकरण करणे, कुटुंबस्तरावर सुका कचरा, ओला कचरा कुंडयामध्ये वर्गीकरण करणे.
  • वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा निर्मिती करुन कचऱ्याचे, घर किंवा घराच्या  परिसरातच व्यवस्थापन करणे.
  • सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तरावर), परसबाग, पाझरखड्डा, शोषखड्डा याद्वारे घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन घर किंवा घराच्या परिसरातच करणे.
  • सदरील विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या निकषानुसार, कुटुंबस्तरावरील प्रत्येक घटकाचे शास्त्रशुद्ध पध्दतीने व्यवस्थापन करण्यासाठी गावातील सर्व कुटुंबामध्ये स्वच्छ माझे आंगण अभियान राबविण्यात यावे.

 अभियान अंमलबजावणी कालावधीचे टप्पे 

  • अभियान कालावधी : 01.01.2025 ते दि.20.01.2025
  • पडताळणी कालावधी : दि. 21.01.2025 ते दि.24.01.2025
  • पात्र कुटुंबांना लेखी स्वरुपात निमंत्रण देणे: दि.25.01.2025
  • प्रशस्तीपत्र वितरण : दि.26.01.2025

 

कुटुंब निवडीचे निकष

  • संबंधित कुटुंबांकडे घरात किंवा परिसरात खालील बाबीं असणे आवश्यक आहे.
  • घरगुती खतखड्डा / परसबाग
  • वैयक्तिक शोषखड्डा/पाझरखड्डा
  • वैयक्तिक शौचालय
  • घरगुती कचराकुंड्या

सदरील कुटुंबांची निवड करण्याकरीता ग्रामपंचायत कार्यालयातील पाणी व स्वच्छता समिती मार्फत दि.21.01.2025 ते दि.24.01.2025 रोजी पर्यंत पडताळणी करुन कुटुंबांची निवड करणेत येणार आहे.

     उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना दि.26.01.2025 रोजीच्या ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सरपंच

          व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करणेत येणार आहे.

अभियानाची माहिती/सुचना गावात दवंडी देणे, ग्रामपंचायत कार्यालय , शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र , सोसायटी कार्यालय, तलाठी सज्जा या ठिकाणच्या सुचना फलकावर प्रसिध्द करणेत येणार आहेत.

या अभियानाचे सनियंत्रण जिल्हा आणि तालुका स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत करणेत येणार आहे.

🤙 9921334545