कोल्हापूर:राधानगरी मतदार संघात समाविष्ठ असलेला आजरा राजकीयदृष्टया ढवळून निघाला आहे. आजऱ्याचे जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी यांनी के.पी पाटील यांना पांठीबा दिला त्या पाठोपाठ जिल्हा बँकेचे युवा संचालक सुधीरभाऊ देसाई यांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा अध्यक्षपदाचा राजिनामा देवून के.पी.पाटील यांना बिनशर्त पांठीबा दिला पेरणोली गवसे मतदार संघातील कार्यकर्त्यानी अबिट करांना दर्शविलेला विरोध व्यक्त भावना लक्षात घेवून महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी.पाटील यांना आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह पांठीबा व्यक्त करत आपण आजरा तालूका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिला असल्याचे मत व्यक्त केले त्याच बरोबर आजऱ्यातून के.पी.पाटील यांना मताधिक्य देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
तसेच राधानगरी तालूका शेतकरी कामगार पक्षाने यावेळी के.पी.पाटील यांना विनाअट पांठीबा दिला.पांठीब्यासाठी आयोजित सभेत प्रास्ताविक पी एस. पाटील यांनी केले यावेळी एकनाथ पाटील म्हणाले राधानगरीच्या खऱ्या विकासासाठी पार दर्शि नेतृत्व असलेल्या के.पी. पाटील यांना पांठीबा देण्याची हीच वेळ आहे. शेतकरी कामगार पक्षाची मतदार संघातील सर्व ताकद के.पी.च्या विजया साठी जीवाचे रान करेल. महाविकास आघाडीच राज्याचा कारभार चांगला चालवू शकते. यावेळी के.पी पाटील बोलताना म्हणाले पुरोगामी विचारांचे सर्व पक्ष आपल्याबरोबर असून खरा कोण खोटा कोण याची पारख आपल्या पक्षाकडे आहे . आपण दिलेला पांठीबा याचेशी बांधिल रहाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी भोगाव ती चे संचालक दत्तात्रय पाटील पांडूरंग पाटील मोहन पाटील आण्णासो पाटील विष्णूपंत एकशिगे उमाजी कांबळे दौलत कांबळे सुधाकर चव्हाण संजय डकरे बापू दळवी भगवान पाटील शिवाजी वाघूर्डेकर रामचंद्र पाटील मधूकर पाटील आदी उपस्थित होते
राधानगरी भुदरगड आजऱ्यातून के.पीपाटील यांच्या पांठी ब्यात होत असलेली वाढ मशालीला बळकटी देणारी तर धनुष्य बाणाच्या अडचणीत वाढ होत असल्याचे चित्र आहे.