मुंबईतील पाच नाक्यांवर टोलमाफी जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पाचही टोलनाक्यांवर टोलमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. आज (14 ऑक्टोबर) रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हलक्या वाहनांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली असून मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी केली आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे

मंत्रिमंडळ बैठकीत झालेले इतर महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :

2.आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3.समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)

4.दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5.आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6.वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7.राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9.खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10.राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

11.पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12.किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13.अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

14.मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

15.खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

16.मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17.अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

18.उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19.कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास).