बॅक वॉटर मध्ये बोट उलटून दोन जवानांचा मृत्यू

चंदगड: तिलारी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये भारतीय सैन्य दलातील राजपुताना रायफलच्या जवानांच्या सरावा दरम्यान बोट उलटून दोन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना (शनिवारी) सायंकाळी तिलारी धरणाच्या बॅकवॉटरच्या हजगोळी परिसरात घडली.

विजय कुमार (वय28,धानीअशा, राजस्थान) व दिवाकर रॉय (वय, 28 रा.पश्चिम बंगाल) अशी मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत.

हे जवान सरावासाठी  तिलारी धरणाच्या धरणातील पाण्यात आले होते एकूण सहा जण या बोटीतून सराव करत असताना अचानक बोट उलटली यामधील सहाही जण पाण्यात पडले यामधील चार जवान पोहत काठावर आली तर विजयकुमार आणि दिवाकर यांच्या दोघांच्या पाठीवर मोठे ओझे  होते तसेच दोरी त्यांच्या पायात अडकल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह चंदगड पोलीस ठाण्यात आणले होते.