नवी दिल्ली: संसदेच्या अधिवेशनादरम्यान दर शुक्रवारी नमाजासाठी अर्धा तासाचा ब्रेक राज्यसभेत रद्द करण्यात आला आहे. या व्यवस्थेची माहिती राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली आहे.
त्यासंबंधीच्या नियमात बदल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
सध्या, राज्यसभेत लंच ब्रेक दर शुक्रवारी दुपारी 1:00 ते 2:30 पर्यंत असतो, तर लोकसभेत लंच ब्रेक दुपारी 1:00 ते 2:00 पर्यंत असतो. राज्यसभेत हा अतिरिक्त अर्धा तास नमाजासाठी देण्यात आला होता, तो आता नियमात बदल करून सभापतींनी रद्द केला आहे.
