
नागपूर : नागपूरवरून अमरावतीकडे निघालेल्या धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. या घटनेत बस जळून खाक झाली आहे.
ही बस 16 प्रवासी घेऊन नागपूरवरून अमरावतीकडे चालली होती. कोंढाळी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराजवळ अचानक या बसला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, या बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, मात्र आग लागल्यामुळे बसचं मोठं नुकसान झालं आहे. बस जळून खाक झाली आहे.बसमध्ये 16 प्रवासी घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरमधून ही शिवशाही बस अमरावतीकडे निघाली होती. या बसमधून एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते. ही बस कोंढाळी परिसरात असलेल्या साईबाब मंदिराजवळ आली असता बसने अचानक पेट घेतला. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत प्रवासी खाली उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
