
कोल्हापूर : राजाराम कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे.शेतकऱ्याच्या ऊसाला वेळेवर तोड देऊन दिलासा दिला आहे. राजाराम कारखान्याच्या वजन काट्यावर अचूक वजन येतं याची सभासदांना खात्री आहे. त्यामुळे स्वतःच्या कारखान्यावर मापात पाप करणाऱ्यांनी राजाराम कारखान्याच्या वजन काट्याबाबत बोलू नये असा टोला अमल महाडिक यांनी लावला.
हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे झालेल्या राजारामच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. राजाराम कारखान्याच्या वजन काट्याच्या वजनात चूक दाखवा मी दोन लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहे असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. विरोधकांच्या कारखान्यात बाराशे किलोचा एक टन मोजला जातो अशी चर्चा असल्याचेही महाडिक यांनी नमूद केले.आम्ही सभासदांना अल्पदरात देत असलेली साखर पाहून विरोधकांचे तोंड कडू झाले आहे असा टोलाही त्यांनी लगावला.यावेळी बोलताना कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी रामा पाटील यांनी सर्जेराव माने यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.
सर्जेराव माने तुम्ही चेअरमन स्वतः होता तरीही तुम्ही कारखान्याच्या विरोधात बोलत आहात .तुमच्यासाठी आणखी काय करायला हवं होतं? असा थेट सवाल शिवाजी पाटील यांनी केला. सर्जेराव तुम्ही तर सरडे राव आहात असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी अरुण माळी, किरण मिठारी,बाबासो पाटील,गणपती माळी, विजय पाटील,अशोक ऐतवडे, कुमार राठोड, सागर गुडाळे, संतोष पाथरे, भीमराव खाडे, प्रकाश पोवार, किशोर शिंगे, महादेव पोवार, ज्ञानू सावंत यांच्यासह मान्यवर आणि सभासद उपस्थित होते.
