नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही एकनाथ शिंदेंना सुरक्षा वाढवू नका, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं; ‘यांचा’ गौप्यस्फोट

नाशिक: नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवू नका, असं तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना तेव्हाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

जेव्हा नक्षलवाद्यांकडून तत्कालीन नगरविकास मंत्री आणि तत्कालीन गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या, त्यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यासाठी पाठपुरावा केला होता. पण उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी सकाळी 8.30 वाजता शंभूराज देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं असल्याचा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला आहे.

एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असतााना त्याला ठार मारण्याची मिळत आहे. पण तरीही तुम्ही त्यांना सुरक्षा पुरवली नाही, तरीही हिंदुत्वाच्या विरोधात त्यांना झेड प्लस सुरक्षा का देण्यात आली नसल्याला सवालही कांदे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंची शिंदे गटाचे बंडखोर आमदार सुहास कांदे भेट घेणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी आमदार सुहास कांदे “माझे काय चुकले?”, असे निवेदन देणार आहेत. त्यानुसार आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सुहास कांदे रवाना झालेत. परंतु त्यापूर्वी कांदे यांच्या ताफ्यातील गाड्यांना शिवसैनिक अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यात भेट होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.