मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आज घेतला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना ५० हजार रुपयांचा अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.शिंदे यांनी सांगितलं की, नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचं अनुदान देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच शेतकऱ्यांनी देखील ही मागणी केली होती. लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये लाखो सामान्य शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय :
पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करणार.

राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान’ राबवणार.

केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० राज्यात राबविणार.

नगरपंचायत व नगरपरिषदा नगराध्यक्षांची निवडणूक आता थेट जनतेतून होणार

राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार.

जिल्हा परिषद व पंचायत समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा. आता बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.

आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली) योजना पुन्हा सुरु करणार.

१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना मोफत बुस्टर डोस.