अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक

अणुस्कुरा : कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात बुधवारी दरड कोसळली आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ दरड हटविण्याचे काम हाती घेतले आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे काल अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक संथ गतीने व एकेरी करण्यात आली असून असून घाटातील रस्ताही मोठ्या प्रमाणात खराब झाला असून काही ठिकाणी खड्डे पडल्याने सावधानता बाळगुन वाहने चालवावी लागत आहेत. अणुस्कुरा घाटात अधुन मधुन दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.