कोल्हापूर : आषाढीवारी निमित्त लिंगनूर दुमाला, ता. कागल येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
वारकऱ्यांना वारीच्या मंगल यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. व पावसातही त्यांच्या प्रवासात अडथळा येऊ नये, म्हणून रेनकोटचा उपयुक्त उपक्रम राबवला.
या प्रसंगी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकासराव पाटील, चंद्रकांत तोडकर, महादेव कुंभार, शिवाजी बावचे, राजू बागडी, बळवंत तोडकर, युवराज बावचे, संतोष बारड, संभाजी बावचे, संदीप मगदूम संभाजी बागडी, दिंडीतील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.