कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय खरीप हंगामपूर्व ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थितीत राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
या अभियाना अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभाग व आत्माचे अधिकारी-कर्मचारी, भारतीय कृषि अनुसंधान परिषद व कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी आदींचा समावेश असणारे एक पथके तयार करून कृषिरथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषयी योग्य मार्गदर्शन करत आहेत.
यामध्ये खरीप पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, आपत्कालीन पिक योजना, कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञान, केंद्र व राज्य शासनाच्या शेती संबंधित विविध योजना, हवामानाचा अंदाज, कीड व रोग नियंत्रण, पशुसंवर्धन, काढणी पश्चात तंत्रज्ञान व केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे अनुदान कसे मिळवावे. अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
या अभियानाद्वारे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास निश्चितच होणार आहे. शेतकऱ्यांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग होऊन नवे ज्ञान मिळवावे आणि आपल्या पिकांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करावी, असे आवाहन यावेळी खा. महाडिक यांनी शेतकरी बांधवांना केले.
यावेळी डॉ. रविंद्रसिंह (कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ) ,. रक्षा शिंदे (कृषी विभाग, आत्मा संचालक), डॉ. विद्यासागर गेडाम आय. सी ए. आर (नवी दिल्ली) शास्त्रज्ञ, डॉ. रविंद्र गजब, डॉ. प्रशांत कवर, डॉ. राहुल यादव, शेखर थोरात (कृषी अधिकारी), ,दिलीप कडवे, धनराज घाटगे, सुरेश मदनी, संजय वाडकर, के. बी. वाडकर, . एम. टी. पोवार, श्रीपती वाडकर, अरुण पवार, ,दिनकर वाडकर, पोपट वाडकर, संदीप वाडकर, विनायक भोसले, रामदास गुरव, सतीश लोंढे, . अमित पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.