कोल्हापुरात काँग्रेस तर्फे भारतीय सैन्याला शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा यात्रा

कोल्हापूर :अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या जवाबी हल्ल्यावेळी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या देशाच्या शूर सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी शनिवार, दिनांक २४/ ०५/ २०२५ रोजी, सकाळी 10:00 वाजता, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथून तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.

यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील महाराष्ट्र विधान परिषद गटनेते तथा अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बी.एम. संदीप जी यांच्या नेतृत्वाखाली व आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन प्रल्हाद चव्हाण अध्यक्ष- कोल्हापूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, राहुल पी.एन. पाटील माजी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषद, गणपतराव पाटील चेअरमन-दत्त साखर कारखाना शिरोळ, राजू लाटकर माजी स्थायी समिती सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस तर्फे शाहू समाधी स्थळ येथून सुरुवात करून सीपीआर हॉस्पिटल चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (महानगरपालिका चौक) – छत्रपती शिवाजी महाराज चौक – भवानी मंडप मार्गे बिंदू चौक येथे तिरंगा यात्रेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात येईल.

🤙 9921334545