कोल्हापूर : शिवनाकवाडी येथे यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादामुळे ३०० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली. प्रभावित रुग्णांवर इंदिरा गांधी रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवनाकवाडी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. व सद्यस्थितीचा आढावा घेऊन तातडीने प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती घेतली. प्रशासनाने रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.या काळात,आपण सर्वांनी एकजूट होऊन एकमेकांना आधार देणे गरजेचे आहे.गावकऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि काही संशयास्पद वाटल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.तुम्हाला आवाहन करतो की या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करा.