मुंबई : दिवा शहराचा मानबिंदू असलेल्या ‘धर्मवीर मित्र मंडळ’ आयोजित दिवा महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून दिवावासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देत संवाद साधला.


यावेळी एकनाथ शिंदेंनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिवावासीयांनी महायुतीला भक्कम साथ दिलेली आहे. त्याबद्दल समस्त दिवावासीयांचे आभार मानले. गेली १६ वर्षे या दिवा महोत्सवाचे आयोजन केले जात असून दरवर्षी एकनाथ शिंदे आवर्जून या महोत्सवाला भेट देतात.
या महोत्सवाच्या निमित्ताने काही क्षण आपल्या कुटूंबासोबत आनंदाने घालवण्याची संधी मिळत असल्याचे मत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले. या शहरात गेल्या काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या असून रस्ते, दिवाबत्ती तसेच अनेक सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत. शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न देखील लवकरच सोडवून इथे अतिरिक्त पाणी देण्याचा प्रयत्न करू असेही यावेळी बोलताना नमूद केले.
यावेळी माजी ठामपा उपमहापौर आणि दिवा महोत्सवाचे आयोजक रमाकांत मढवी, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
