मुंबई : स्वाभिमानीकडून गेल्या अनेक दिवसापासून बेदाणा करमुक्त करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. बेदाणा हा सुकामेवा ग्रहीत धरल्याने कराच्या कक्षेत येत होता. मात्र आता मनुका जीएसटी मुक्त झाला असून, कृषी उत्पादनाचा दर्जा मिळाला आहे. अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली त्यामुळे स्वाभिमानीच्या लढ्याला यश आले आहे.
वास्तविक पाहता द्राक्षे सुकवून बेदाणे तयार करतात यामुळे तो कृषी उत्पादनाचा भाग येतो. मात्र केंद्र सरकारकडून त्याला 5 टक्के जीएसटी आकारला जायचा. सध्या वस्तू व सेवा कराच्या कक्षेतून बेदाणा वगळल्यामुळे याचा द्राक्ष उत्पादक शेतक-यांना फायदा होईल. बेदाणा उत्पादक शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मानले.