पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केले रद्द!

पुणे: पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश करण्याचे धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केले आहे .त्यामुळे पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात येणार आहे. तसेच त्यांना दोन महिन्यांच्या आत पुन्हा परीक्षा देता येणार आहे .मात्र पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळणार नाही. तसेच कुठल्याही शाळेला इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी नो डिटेशन पॉलिसी संपुष्टात आणत,दीर्घकाळापासून सुरु असलेली ही व्यवस्था बदलली आहे. मुलांमध्ये शिक्षणाची क्षमता सुधारणे आणि शैक्षणिक कामगिरी उंचावणे ही हा निर्णय घेण्या मागचे उद्दिष्ट असल्याचे सरकारने सांगितले आहे.

शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजीव कुमार यांनी सांगितले की, मुलांमधील शिकण्याच्या क्षमतेमध्ये होत असलेली घसरण थांबवण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. मंत्रालयाने विशेष करून पाचवी आणि आठवी वर लक्ष केंद्रित केले आहे. कारण पायाभूत शिक्षणाच्या दृष्टीने हे वर्ग महत्त्वाचे मानले जातात. या धोरणामधुन विद्यार्थी आणि शिक्षकांना अभ्यासाप्रति अधिक जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

🤙 9921334545