कोल्हापूर : आज(दि.20) कोल्हापूर मधील शिवाजी पेठ येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर आणि आम्ही भारतीय लोक आंदोलन शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्यावतीने संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त झुणका भाकरी वाटप करण्यात आले. सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये अनिल चव्हाण यांनी “गाडगेबाबांनी शंभर वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केलेले आहे. गाडगेबाबांनी शंभर वर्षांपूर्वी व्यसनमुक्तीचे काम केलेले आहे. स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले आहे. बंधुभाव शिकवला आहे. त्यांची शिकवण आपण अमलात आणली पाहिजे”, असे प्रतिपादन केले.
कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि यांनी आपल्या भाषणात आजच्या परिस्थितीत गाडगेबाबांचे महत्त्व सांगितले. “आज देशात लोकांना व्यसनी करण्यासाठी खास प्रयत्न केले जातात. बंधुभाव नष्ट करण्याचे काम चालू आहे. गाडगेबाबांचे विचार संविधानामध्ये आलेले आहेत, त्या संविधानाला बदलण्याचे प्रयत्न चालतात, ते हाणून पाडले पाहिजेत”
मीना चव्हाण यांनी आपल्या भाषणात, गाडगेबाबांचा विचार मांडला.” देव देवळात नसतो देवळात भटजीचे पोट असते, देव माणसात असतो, माणसाला मदत करा, भुकेलेला अन्न द्या, तहानलेला पाणी द्या अडाण्याला शिक्षण द्या”.
प्रा डॉ छाया पवार यांनी गाडगेबाबा सोप्या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन कसे करत त्याचे उदाहरण दिले, “एका नदीच्या काठावर पितर शांती सुरू होती. गाडगेबाबा नदीच्या पाण्यात उतरले; गुडघाभर पाण्यात उभा राहून ते ओंजळीने पाणी बाहेर फेकू लागले; लोक म्हणाले बाबा हे काय करता तुम्ही? बाबा म्हणाले “काय सांगू बाळा दहा मैलावर माझे शेत आहे; तिथे पाणी घालायला मला जाता येत नाही; म्हणून त्या शेताला मी पाणी घालतो आहे. लोक हसू लागले, त्यांना वेड्यात काढलं; तेव्हा बाबा म्हणाले, इथून भडजीला दिलेले नैवेद स्वर्गात मित्रांना पोचतो, इथं दिलेले, अर्ध दूरवर असलेल्या सूर्याला पोहोचते, आणि इथे दहा मैंलावरच्या शेताला माझे पाणी पोहोचायला काय अवघड आहे?” लोकांचे डोळे खाडकन उघडले.
यानंतर कोंडेकर यांच्या हस्ते झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी साधना देसाई, जयंत मिठारी, सुहास साळुंखे ,अस्मिता चव्हाण, छोटू सावंत,जगदीश सूर्यवंशी, सुनंदा चव्हाण, ईशा चव्हाण, चंदू मिस्त्री (सूर्यवंशी), शोभा शिवाजी शेळके,पंडित कृष्णाजी ढवळे, रमेश वडणगेकर, संभाजी इंगवले, राजेंद्र खद्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.